जिजाऊ जयंती निमित्त कोपरगांव मध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार
कोपरगाव दत्ता पुंडे – राष्ट्र पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करतांना त्यांनी दिलेला विचार जीवनात आणण्याचा प्रयत्न व्हावा. हिंदवी स्वराज्याची उभारणी तलवारीच्या पाती इतकीच कौतुकाच्या थापेमुळे झाली. पाठीवर पडलेल्या थापेमुळे स्वराज्याच्या उभारणीत हजारो मावळे निष्ठेने जोडले आणि टिकले. अशीच कौतुकाची थाप विद्यार्थी दशेत पाठीवर पडली तर ही एक आदर्श पिढी घडून उच्च शिक्षणाच्या वाटेवर चालताना ते आपल्या ध्येयापासून विचलित होणार नाहीत असे प्रतिपादन योग शिक्षिका सौ. विमल पुंडे यांनी व्यक्त केले.
त्या योग प्रचार प्रसार संस्था कोपरगाव यांनी आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. कु. शाल्मली गोखले, अंजली लाड, आरती दिवेकर, हर्षदा भगत, खुशी शहा, प्रसाद पुंडे,ओम गोखले आदी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी हजर होते.
याप्रसंगी राजश्री दौलतराव जाधव, ऊमा विजय वहाडणे, अर्चना लाड, गिरीषा कदम, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास, विद्या गोखले, रत्ना पवार, शोभा कानडे, शितल चव्हाण, स्नेहल भोसले, हर्षाली बागड, प्रतिभा वालझडे, स्मिता कुलकर्णी, ज्योत्स्ना धामणे, जयश्री गुजराती, जोती काटकर, रंजना भोईर, सुजाता कोपरे, शितल आमले आदी अनेक महिला कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनिता भुतडा, वैशाली दिवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.